म्हटले तर माझे विचार , म्हटले तर माझे अनुभव ...

Monday, November 10, 2014

सर्वात आवडती १० हिंदी मिश्र गीते -

मला माणूसजातीच्या भुतांची भिती वाटत नाही.. पण शैलजा रेगेमुळं आवडत्या गाण्यांची, मी त्यांच्यावर साफ अन्याय केल्यामुळं संतापून जी भुतं मनावर नाचणारेत, त्यांची जाम भिती वाटतेय.. आत्ता मघापासून बसलेय तर कुणी सारखी 'आणि मी?', 'मी गं!', 'आता माझा नंबर ना?', 'कसली वाईट आहेस गं!! नुसतीच माझं आवडतं, माझं खुप आवडतं म्हणत असतेस होय..', असा आरडाओरडा करतायत, तर कुणी फक्त शांतपणे आपला नंबर नक्की कधी म्हणत माझी तारांबळ बघतायत. खाली पहिली 10 गाणी लिहीण्यापूर्वी ही चुळबूळ करणारी, रांगेत शांत उभी राहिलेली गाणीही नमूद करायला पाहिजेत.. त्यात 'अभी ना जाओ छोडकर', लताचं 'आज की रात न जा', कुमारांचं 'निक्के निक्के तारनहारी', मुकेशचं 'आंसूभरी है ये जीवन की राहें', कैलास खेरचं सैंया, रेहमानचं हायवेतलं 'माही वे', नव्या अग्निपथमधलं सोनू निगमचं 'अभी मुझमें कहीं' आणि रूपकुमार राठोडांचं 'ओ सैंया'.. बाप रे! आणखी खुप आहेत.. असो.. ही माझी आवडती पहिली 10 गाणी -
1. मिला है किसीका झुमका - परख - लता
2. ऎसे तो ना देखो - महंमद रफी
3. नन्ही कली सोने चली - गीता दत्त
4. अवधूता - कुमार गंधर्व
5. सलौनासा सजन है - आशा
6. कून फाया कून - मोहीत चौहान, रेहमान
7. तूही रे - हरीहरन
8. ये तनहाई हाए रे हाए - लता
9. सीनें में सुलगते है अरमां - तलत, लता
10. बाजे मुरलीया बाजे - लता आणि भीमसेन जोशी

No comments:

Post a Comment