म्हटले तर माझे विचार , म्हटले तर माझे अनुभव ...

Saturday, March 26, 2016

कुबेरांचा आजचा अग्रलेख. गांभिर्यानं विचार करण्याचा मुद्दा आहे. ही वृत्ती बोकाळतेय. ज्या इमारतीत रहाते, त्या इमारतीचा देखभालखर्च देताना व्यवस्थापन बघणा-यांना 'काय उजेड पाडता' असे प्रश्न निर्लज्जपणे अरेरावीनं विचारले जातात. भ्रष्टाचाराबद्दलच्या ह्या सुरातल्या चर्चा लंच टेबलवरही हिरीरीनं मुठीबिठी आपटून ऐकल्यायत. सिग्नल्सवर ट्रॅफिक पोलिसांनी पकडल्यावर लोकांच्या अंगात जी वीरश्री संचारते, ते तर वारंवार दिसणारं चित्र आहे. मी काहीतरी असं केलंय, वागलेय, ज्याची मला दिलगीरी असली पाहिजे, हा शरमेचा भाव कुठेच नसतो, उलट पकडले गेल्यावर चेव चढतो.

http://www.loksatta.com/aghralekh-news/ticket-less-woman-traveller-says-wont-pay-fine-catch-vijay-mallya-first-1219632/

No comments:

Post a Comment