म्हटले तर माझे विचार , म्हटले तर माझे अनुभव ...

Tuesday, September 22, 2020

 आज कविवर्य शंकर वैद्यांचा स्मृतीदिन. त्यांच्या रचना फार आवडतात, पण हे काव्य म्हणजे शिवरायांच्या व्यक्तिमत्वाचं साक्षात् पेंटिंग आहे. लहानपणापासून शिवाजी महाराजांची क्रमशः ओळख होत आलेली होती आणि अजूनही होतेच आहे, तरी ते माझा महत्त्वाचा क्रश होण्याच्या प्रक्रियेत ह्या रचनेचा मोठाच हातभार आहे. 'धीमी पाऊले टाकीत येता रुद्राचा अवतार' असो किंवा 'शिवरायांची नजर फिरे अन् उठे मुलूख सारा' ह्या ओळी शब्दशः प्रत्यय देतात.

धन्यवाद आकाशवाणी ❤️ मी हे लिहून पूर्ण होईतोवरच हे गीत वाजूही लागलंय 🙂🙏🌹
टाळेबंदीच्या काळात सह्याद्री वाहिनीवर शंकर वैद्य यांनी घेतलेल्या अनेक मुलाखती पहाण्यात आल्या. त्यांचा व्यासंग, प्रसन्न व्यक्तिमत्त्व, थोडंसं खर्जाकडे झुकणारं सौम्य आणि मीतभाषी बोलणं, आवश्यक तिथेच केलेलं सुरेख प्रसंगानुरूप आपलं आणि इतर कवी-कवयित्रींच्या काव्यांचं वाचन, वक्त्याला बोलतं करण्याची आणि बोलू देण्याची शैली प्रभावित करून गेली.
https://www.aathavanitli-gani.com/Song/Shatakanchya_Yadnyatun

No comments:

Post a Comment