म्हटले तर माझे विचार , म्हटले तर माझे अनुभव ...

Tuesday, September 8, 2020

कोल्हापुरात संध्याकाळपासून वीजांच्या गडगडाटासह ढगफुटीसदृश भयावह पाऊस चालू आहे. रोजच झोडपतो हल्ली, पण आज उतू जातोय. शहरात अनेक ठिकाणी प्रचंड पाणी साठलंय. रस्त्यांचे ओढे झालेत. काही आवश्यक औषधांसाठी गावभागात जाऊन परतताना अनेक ठिकाणी फिरत, लांबचे वळसे, थांबे घेत कसंतरी घरी पोचता आलं. जमिनी पाण्यानं तुडुंब झाल्यात. माझ्या परिसरातल्या बैठ्या घरांमध्ये अचानक जमिनीतून उमाळे येत गुडघाभर उंचीची तळी झालीयेत. त्यात आजुबाजूच्या कुंपणं घातलेल्या रिकाम्या प्लॉटस् मधलं निचरा होऊ न शकणारं पाणी मिळून परिस्थिती आणखी चिघळतेय. लोक तुफान पावसात भिजत गटारं रिकामी करीत, पत्रे लावत दोदाणा निस्तरायचा प्रयत्न करतायत. भितीदायक चित्र आहे. 

No comments:

Post a Comment