म्हटले तर माझे विचार , म्हटले तर माझे अनुभव ...

Saturday, September 2, 2017

गांधीजी उदंड आहेत, अगाध आहेत, प्रत्येकासाठी त्या माणसाकडे काही ना काही आहे. ते एक मोठं कुतूहल आहे. माझ्यासारख्या असंख्य सामान्य व्यक्तींना 'मोहनदास करमचंद गांधी' ह्या व्यक्तिमत्वाचे अनंत धागे उलगडून दाखवण्याचं मोठं काम अक्षरनामावर सध्या सुरू आहे. दर महिन्याच्या दोन तारखेला गांधींवर लेख प्रकाशित होत आहेत. त्या मालिकेतला आजचा हा एक अतिशय सुंदर, विचारप्रवर्तक लेख.

आतापर्यंतचे सर्वच लेख उत्तम आहेत, मात्र आजच्या लेखातून मला सद्यस्थितीतल्या रोजच्या जगण्यात वारंवार सामोरं जाव्या लागणा-या मुद्द्यांचा उहापोह आहे. मी विचारवंत नाही, अभ्यासक नाही की राजकारणी नाही, पण तरीही काही विशिष्ट विचारधारा मला असायला हवीच. अशा सामान्य नागरीकासाठी चांगलं, दर्जेदार जगण्यासाठी जी विचारप्रक्रिया आवश्यक आहे, ती गांधीजी देतात. ते इतर कुठे इतक्या क्लॅरिटीनं आणि इतक्या सुलभपणे क्वचितच उपलब्ध होईल असं वाटतं. ह्या सकस लेखमालिकेसाठी विशेष धन्यवाद अक्षरनामा!

No comments:

Post a Comment