म्हटले तर माझे विचार , म्हटले तर माझे अनुभव ...

Sunday, September 24, 2017

कोल्हापुरात पाऊस दणकतोय. पावसानं सगळ्यांना स्थानबद्ध केलंय जणू!
आज ललितापंचमी आहे, टेंबलाईच्या यात्रेचं काय झालं असेल एक टेंबलाई जाणे. सगळ्या दुकानांचा, मालाचा पार बोजवारा उडाला असेल.

डबलडेकर, बिंदू चौकातल्या लंब्याचौड्या रांगा, तो माणसांनी फुललेला भलामोठा माळ, देवळाच्या वाटेवरची हारीनं लागलेली दुकानं, मातीची चित्रं, रंगीत गॉगल, चावीची खेळणी, गाड्या, बाहुल्या, पिपाण्या, पिसांच्या टोप्या, भोवरे, चक्रं, फिरते घोडे, मेरी गो राऊंड, म्हातारीचा कापूस, भेंडबत्तासे, चणेदाणेचिरमुरे, दोर ताणलेल्या तंबूतली बाकडी टाकलेली हाटीलं, उकळत्या चहांचे आणि कढलेल्या तेलांचे वास, भकाभक ढणढणणा-या गॅसबत्त्या, पिपाण्यांचा गोंगाट, घरी परततानाचे पायांचे तुकडे आणि पेंगुळलेले डोळे.

पुढच्या वर्षी गाठली पाहिजे यात्रा. असं दरवर्षी म्हणायचं.

No comments:

Post a Comment