म्हटले तर माझे विचार , म्हटले तर माझे अनुभव ...

Sunday, September 3, 2017

रजनी करकरे गेल्या. वाईट वाटलं. आनंदी बालपणाचे एकेक सांधे निखळत आहेत. रजनीताई म्हणलं की 'स्वप्नातल्या कळ्यांनो उमलू नकाच केव्हा' ही आठवण पहिली येते. मी शाळेत असताना ह्या नावाला कोल्हापूरात त्यांच्याभोवती आदबशीर वलय होतं. माझी आई आणि त्या समकालीन गायिका, दोघीही सुंदर गायच्या. त्यामुळे आईबद्दलच्या आठवणीत त्या हटकून असतातच. एक दोन स्पर्धांना त्या परिक्षक होत्या आणि त्यांच्या हस्ते पारितोषिकंही घेतली. शालेय जीवनात ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. सगळ्या ऑड्सवर मात करून आयुष्य आनंदानं भरभरून कसं जगावं ह्याचा तर त्या वस्तूपाठ म्हणता येतील. त्यांना मन:पुर्वक आदरांजली.

No comments:

Post a Comment