अविनाश चव्हाणांनी निरोप घेऊन आज वट्ट दहा वर्षं झाली. परवा पुस्तक मेळाव्यात वॉल्डन प्रकाशनाच्या दालनात शेजारी कुणीतरी सात सक्कं त्रेचाळीस चाळताना दिसलं तेव्हा नगरकरांचा हा कट्टर पंखा आठवून हसू आलं. आठवणींची छान छान असोसिएशन्स असतात.
पण समीकरणं केवढी बदलतात एका दशकात. आता Ashok Patil वर्षाकाठी जेमतेम एखाद्या वेळी भेटीची वेळ देतात, तेही गेला बाजार ४-५ लेखी मेसेज, निदान २-३ व्हॉईस नोट्स आणि किमान १-२ फोनचा रतीब घातल्यावर. यंदा दिवाळीत तर त्याचाही काही उपयोग झालेला नाही. वाचन वेल्हाळचे सगळे सदस्य आपापल्या व्यापांमध्ये व्यग्र झाले, स्थलांतरं झाली. आणि हे होणं स्वाभाविक आहे.
मग मामा, पुन्हा केव्हा भेटायचं चव्हाणांची मापं काढायला? यावेळी जरा दयामाया करू त्याच्यावर. पुढचं पुस्तक कोणतं भेट देताय मला?
No comments:
Post a Comment